• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 15, 2016

बामनदेव मार्गाच्या सफाईस प्रारंभ

adminbyadmin
in नवी मुंबई
0
बामनदेव मार्गाच्या सफाईस प्रारंभ

सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : मार्च महिन्यात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित बामनदेव भंडार्‍याकरता खाडीअंर्तगत भागात बामनदेव मार्गाच्या साफसफाईकरता सारसोळेच्या युवा ग्रामस्थांनी शनिवारपासून सुरूवात केली आहे.
पामबीच मार्गावर बामनदेव मार्गावर वर्दळ सुरू झाली की बामनदेवाचा भंडारा जवळ आल्याचे संकेत वाहनचालकांना प्राप्त होतात.सारसोळेच्या खाडीअंर्तगत भागात सारसोळे गावातील मासेमारी करणार्‍या आगरी-कोळी लोकांचे श्रध्दास्थान आहे. सारसोळेची जेटी सोडली की बेलापूरहून वाशीकडे येणार्‍या मार्गावर खाडीच्या बाजूस डावीकडे वळसा मारल्यास आपणास थेट बामनदेवाच्या मंदिराकडे जाता येते. बामनदेव हा शिवशंकराचा अवतार मानला जातो. बामनदेवाला बंदीस्तपणा आवडत नसल्याने हे मंदिर खुलेच व विनाछताचे पहावयास मिळते.
खाडीमध्ये मासे पकडण्यास गेल्यास वादळ-वार्‍यात व अन्य संकटांमध्ये तसेच जेटी परिसरात रात्री-अपरात्री वावरताना बामनदेवच आपले रक्षण करतो, अशी सारसोळेच्या ग्रामस्थांची भावना आहे. खाडीअंर्तगत भागातील बामनदेव मार्गाचा अपवाद वगळता नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सर्व
रस्त्यांचे डांबरीकरण केलेले आहे. बामनदेव मार्गाचे डांबरीकरण व्हावे याकरता सारसोळेचे ग्रामस्थ गेली आठ वर्षे महापालिका ते मंत्रालय पाठपुरावा करत आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त सारसोळेच्या ग्रामस्थांकडून ‘कोलवाणी माता मित्र मंडळा’च्या माध्यमातून बामनदेव भंडार्‍याचे आयोजन करण्यात येते. बामनदेवाकडे जाणारा मार्ग आजही कच्चाच व खाचखळग्यांचा असून पावसाळ्यानंतर त्या ठिकाणी सहा ते सात फूट जंगली गवत वाढलेले पहावयास मिळते. बामनदेव भंडार्‍यामध्ये दरवर्षी बारा ते पंधरा हजार भाविक सहभागी होत असल्याने भाविकांकरता रस्ता व्यवस्थित असावा याकरता सारसोळेचे ग्रामस्थ महिनाभर अगोदरच रस्ता सफाईस सुरूवात करतात. सुकलेले जंगली गवत काढणे, रस्त्यांचे खड्डे बुजवून सपाटीकरण करणे या कामातच 15 ते 20 दिवस जातात. या मार्गावर एकेकाळी तीन हजार लोकांचा राबता असायचा, पण मिठागरे बंद झाल्यावर वर्दळ तुरळक झाली. आता केवळ मासेमारीकरता व बामनदेवाच्या दर्शनाकरताचा सारसोळेचे ग्रामस्थ या मार्गावरून ये-जा करत असतात.

Previous Post

‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास रस्त्यावर उतरु’

Next Post

ढिसाळ नियोजनामुळेच आग

Next Post
मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची?

ढिसाळ नियोजनामुळेच आग

दिवाळे गावाच्या विकासासाठी स्वतंत्र कृती आराखडा :आ.मंदा म्हात्रे

दिवाळे गावाच्या विकासासाठी स्वतंत्र कृती आराखडा :आ.मंदा म्हात्रे

रेल्वेच्या बेजबाबदारपणाचा आणखी एक नमुना

फुकट्या प्रवाशांकडून मध्य रेल्वेने वसूल केले १०३ कोटी रुपये

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com