• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 10, 2017

संघर्षच्या लढ्याला यश; आयटीआयची गळती बंद

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
खारघर बारप्रकरणी कोकण आयुक्तांनी मार्ग काढावा: संघर्ष
सार्वजनिक बांधकाम खात्याने केली डागडुजी
पनवेल : पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या दुरवस्थेबाबत संघर्ष समितीने उठविलेल्या आवाजानंतर सावर्जनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी तात्काळ डागडुजी केली. छप्पराला लागलेली गळती बंद करण्यासाठी ताडपत्रीचा आधार घेतला होता, ती काढून नवीन सिमेंटची पत्रे टाकण्यात आली आहेत. त्याशिवाय स्वच्छतागृहांची साफसफाई करून त्यांचीही दुरूस्ती करण्यात आली आहे.
पनवेल आयटीआयला लागलेल्या ग्रहणामुळे गेली अनेक वर्षे इमारतीची दुरवस्था झाली होती. पिलर मोडकळीस आलेले आहेत. छप्पर फुटल्याने खोल्यांमध्ये पाण्याचे तळे साचले आहे. स्वच्छतागहांना दरवाजे नाहीत. ती तुंबली आहेत. परिसरात अतिशय उकिडा निर्माण झाला आहे. दुर्गंधीने विद्यार्थी आणि निदेशक हैराण झाले आहेत. आयटीआयची किंमती यंत्रे पावसाच्या पाण्यात बुडाल्याने परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मृत्यूची तलवार लटकत होती. याबाबत संघर्ष समितीने आयटीआयचे राज्य संचालक अनिल जाधव, प्राचार्य एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य पिल्ले, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अधिकारी राहूल मोरे, उपअभियंता एस. एम. कांबळे, डांगे आदींची संयुक्त बैठक घेवून डागडूजी तात्काळ करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला होता.
परंतु, दोन्ही विभाग दूर्लक्ष करून कागदी घोडे नाचवत असल्याचा हलगर्जीपणा संघर्ष समितीच्या लक्षात येताच, तिथेच उपोषण सुरू करीत असल्याचे पत्र संघर्षचे अध्यक्ष कांतीलाल कडू, उपाध्यक्ष विजय काळे, माधुरी गोसावी, सदस्य पराग बालड, कविता ठाकूर, उज्वल पाटील, ऍड. संतोष सरगर, किरण घरत, मंगल भारवड, रमेश फुलोरे, शेख, भारती जळगावकर, सीमा पाटील आदींनी दिले होते.
त्यानंतर पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील बाजारे यांच्याकडे प्राचार्य एस. व्ही. पाटील आणि सावर्जनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता डांगे यांनी लेखी पत्र देवून संघर्ष समितीच्या मागणीनुसार दुसर्‍याच दिवशी डागडुजी सुरू करीत असल्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार त्यांनी तात्काळ डागडुजीला प्रारंभ केला. 
नव्या इमारतींसाठी संघर्षने पावले टाकली असून येत्या आठवडाभरात आयटीआयचे संचालक अनिल जाधव व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेवून ठोस मार्ग काढण्यात येणार आहे.
Previous Post

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नुकसानाला सरकारच जबाबदार – जयंत पाटील

Next Post

कल्याण डोंबिवली क्षेत्राला क्लस्टर योजना लागू करण्यास राज्य सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

Next Post
कल्याण डोंबिवली क्षेत्राला क्लस्टर योजना लागू करण्यास राज्य सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

कल्याण डोंबिवली क्षेत्राला क्लस्टर योजना लागू करण्यास राज्य सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नुकसानाला सरकारच जबाबदार – जयंत पाटील

मुख्यमंत्री कोणाच्या तरी दबावाखाली काम करताहेत - जयंत पाटील

घणसोलीतील सेंट्रल पार्क आणि ऐरोलीच्या नाटयगृहाचे काम लवकर पूर्ण करा

समूह विकास योजनेत प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांच्या सर्व संघटनांच्या मागण्यांच्या समावेशासाठी आमदार संदीप नाईक आग्रही

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com