• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 14, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 27, 2020

ईएमआय स्थगितीमुळे मध्यमवर्गीयांना दिलासा!: अशोक चव्हाण

adminbyadmin
in Uncategorized
0
महाराष्ट्रातील सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले!

निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी बॅंकांवर दबाव ठेवण्याची मागणी

मुंबई : ऱिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व कर्जांच्या ईएमआयला तीन महिन्यांची स्थगिती देण्याची घोषणा केल्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र बॅंकांकडून या घोषणेची अंमलबजावणी करून घेण्यासाठी सतत पाठपुरावा करून त्यांच्यावर दबाव ठेवण्यात यावा, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले की, शेतकरी, व्यापारी, उद्योजकांनी व्यवसायासाठी घेतलेली विविध कर्जे, कॅश क्रेडिट आणि ओव्हर ड्राफ्टचे व्याज, नोकरदार, कामगारांवरील गृहकर्ज, वाहन कर्ज, पर्सनल लोन आदी आर्थिक दायित्वाबाबत देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कारण उद्योग- व्यवसाय ठप्प असल्याने आर्थिक व्यवहार थांबले आहेत. बहुतांश लोकांकडे फारसे पैसे शिल्लक नाहीत. कोरोनामुळे घरी असतानाही वेतन मिळण्याची शाश्वती असलेले स्थायी कर्मचारी वगळता इतरांनी या कर्जांचे हप्ते भरायला पैसे कुठून आणायचे, हा मोठा प्रश्न होता. अनेकांचे कर्ज हप्ते बिले ऑटो डेबिट होतात. अशा परिस्थितीत एक जरी हप्ता चुकला तरी त्याचा ‘सिबिल’वर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता होती.

या पार्श्वभूमिवर लोकांची ही अडचण लक्षात घेता रिझर्व्ह बॅंकेने सर्व वित्तीय संस्थांच्या सर्व कर्जांचे देय हप्ते, ईएमआय, कॅश क्रेडिट व ओव्हर ड्राफ्टवरील व्याज तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोनाविरूद्धच्या लढ्यातील उपाययोजनांबाबत पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात देखील ही मागणी मांडली होती. त्यानुसार आज रिझर्व्ह बॅंकेने सर्व कर्जांचे हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची स्थगिती देण्यासाठी बॅंकांना परवानगी दिल्याने प्रामुख्याने शेतकरी, नोकरदार, कामगार, उद्योजक, व्यापारी आदी घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र रिझर्व्ह बॅंकेने केवळ परवानगी देऊन चालणार नाही. तर या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी बॅंकांकडे सातत्याने पाठपुरावा करून दबाव ठेवावा लागेल, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

Previous Post

महापालिकेकडून रस्तोरस्ती जंतुनाशक फवारणीचे काम तर राजकारण्यांकडून मदतीचा ओघ

Next Post

राज्यात रक्तसाठा आठलाय, सातच दिवसच पुरेल रक्त, रक्तदात्यांनो आता पुढं या रे ऽऽऽ

Next Post
राज्यात रक्तसाठा आठलाय, सातच दिवसच पुरेल रक्त, रक्तदात्यांनो आता पुढं या रे ऽऽऽ

राज्यात रक्तसाठा आठलाय, सातच दिवसच पुरेल रक्त, रक्तदात्यांनो आता पुढं या रे ऽऽऽ

युवक काँग्रेस रक्तदानातून पुरवणार राज्याच्या रक्तपेढीस १०,००० रक्ताच्या पिशव्या

युवक काँग्रेस रक्तदानातून पुरवणार राज्याच्या रक्तपेढीस १०,००० रक्ताच्या पिशव्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

करोनाग्रस्त परिस्थितीत अनेक संस्था, व्यक्ती यांचा मदतीचा हात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com