• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 26, 2021

निवडणूक अनिश्चिततेमुळे प्रस्थापितांसह इच्छूकांचेही देव पाण्यात!

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रभाग ८७ मधील कंडोनिअम अंर्तगत कामे करा : सौ. सुनिता रतन मांडवे

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

संदीप खांडगेपाटील : ८३६९२४६४६ – ९८२००९६५७३

नवी मुंबई : कोरोनाने पुन्हा जोमाने डोके वर काढू लागल्याने नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक पुन्हा काही कालावधीकरता लांबणीवर पडणार असल्याची जोरदार चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्याने निवडणूक लढवू पाहणाऱ्या प्रस्थापितांसह इच्छूकांचे धाबे दणाणले आहेत. निवडणूका लांबणीवर पडल्यास मतदारांना आकर्षित करण्यासाठी खर्च करण्यासाठी निधी परत कोठून आणायचा यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे. महापालिका निवडणूक कार्यक्रम अनिश्चिततेच्या शक्यतेने प्रस्थापितांसह इच्छूकांनी देव पाण्यात ठेवले असल्याचे प्रभागाप्रभागात पहावयास मिळत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणार होती. तथापि कोरोना महामारीमुळे निवडणूका तब्बल वर्षभर लांबणीवर पडल्या आहेत. या काळात कोरोना महामारीचा उद्रेक झालेला असतानाही निवडणूका डोळ्यासमोर ठेवून प्रस्थापितांनी तसेच निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छूकांनी जीवाचे रान करून स्थानिक रहीवाशांच्या पर्यायाने मतदारांच्या गळ्यातील ताईत बनण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्नही केला होता. लिम्सीच्या गोळ्या वाटणे, मास्क वाटणे, सॅनिटायझर्सचे वाटप, धुरीकरण, आर्सेनिक ३० या रोगप्रतिकारक गोळ्यांचे वितरण, धान्याचे वाटप, कोरोनाग्रस्तांना रूग्णालयात प्रवेश मिळवून देणे, आयसीयूमध्ये प्रवेश मिळवून देणे, व्हॅनटिलेटर उपलब्ध करून देणे, अगदी कोरोनाने मृत्यू झाल्यास रूग्णवाहिका ते स्मशानभूमीपर्यतची तजवीज करणे, कोरोनाने मृत झालेल्यांच्या घरी जावून सांत्वन करणे, कोरोना रूग्णांच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात सतत जंतुनाशक फवारणी, स्वस्त दरात भाज्यांची, फळाची, धान्याची विक्री यासह शेकडो उपक्रम प्रभागाप्रभागातील कानाकोपऱ्यात, चौकाचौकात प्रस्थापितांसह निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छूकांकडून सातत्याने राबविण्यात आले. हे समाजकार्य करताना अनेकांना कोरोनाचीही लागण झाली. कोरोनातून बरे होताच निवडणूक लढवू पाहणारे हे घटक पुन्हा जनसेवेत व्यस्त झाल्याचे पहावयास मिळाले. या काळात कोरोनाच्या भीतीने गावी पळून गेलेले काही प्रस्थापित तसेच इच्छूक राजकीय घटक त्यांच्या विभागात उपहासात्मक चर्चेचे विषयही बनले होते. जुईनगर नोडमध्ये एका राजकीय घटकांने शेतातील पंपही अळीनाशक फवारणीसाठी आणल्याचे अनेकांनी जवळून पाहिले होते. सतत गावी ये-जा करणाऱ्या राजकीय घटकांना त्यांच्या विरोधकांमुळे घरीच १४  दिवसाचा  वनवासही सहन करावा लागला. कोरोना  काळात तब्बल वर्षभर निवडणूक लढविण्याच्या एकमेव महत्वाकांक्षेपायी प्रस्थापितांसह इच्छूकांनी आपल्या खिशातून लाखो रूपयांची उधळपट्टीही करावी लागली. ठेकेदारांकडून केलेल्या विकासकामातून मिळालेल्या मिठाईमुळे प्रस्थापितांच्या खिशाला फारशी झळ बसली नसली तरी अन्य इच्छूक घटकांना मात्र कर्ज काढून समाजसेवकाचे चित्र मतदारांसमोर वठवावे लागले आहे.

निवडणूकीच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहिर झाला. प्रस्थापितांसह इच्छूकांनी हरकती घेण्याचा जोरदार कार्यक्रम पार पाडला. मतदार पळवापळवी, ५०० ते १५०० रूपयांपर्यतच्या आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुराही भाजपा व  राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नुकताच पार पडला. आयाराम-गयारामाचे कार्यक्रम सुरूच आहे. मातब्बरांनी दुसऱ्यांच्या प्रभागात अतिक्रमण करून निवडणूक लढविण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या असतानाच पुन्हा एकवार गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूक लढवू पाहणाऱ्या प्रस्थापितांसह इच्छूकांच्या वाटचालीत पुन्हा एकवार कोरोना महामारीचे मांजर आडवे आले आहे. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढू लागली आहे. निवडणूक लढवू पाहणाऱ्यांकडून आयोजित केले जात असलेले हळदीकुंकवाचे कार्यक्रम कोरोनाला हातभार लावत असल्याचे मत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून उघडपणे व्यक्त होवू लागले आहे. त्यातच कोरोना  वाढत असल्याने लोकांचे जीवन महत्वाचे आहे, राजकारण नाही, प्रशासकीय काळातही नागरी सुविधा मिळत असल्याने व नागरी समस्यांचे निवारण होत असल्याने निवडणूका लांबणीवर टाकण्याची मागणी आता सर्वसामान्यांकडूनच उघडपणे केली जावू लागली आहे. पुन्हा निवडणूका लांबणीवर पडल्यास जनतेमध्ये टिकून राहण्यासाठी तसेच कोरोना वाढल्यास पुन्हा समाजसेवकांचे रूप वठविण्यासाठी खर्च करायला निधी आणायचा कोठून या विचारानेच आता प्रस्थापितांसह इच्छूकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे कोरोना  महामारी आटोक्यात यावी व निवडणूका एप्रिल २०२१मध्ये पार पडाव्यात यासाठी सर्वच राजकीय घटकांनी आपल्या घरातील देवही पाण्यात ठेवले असल्याचे उपहासाने बोलले जावू लागले आहे.

Previous Post

केंद्र सरकारने जाचक रस्ते विकास सेस बंद करावा किंवा देशभरातील टोल तरी बंद करावेत !:  नाना पटोले

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी बुथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले

Next Post
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी बुथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी बुथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले

पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रभाग ७९ मध्ये ७ मार्च रोजी विविध कामांचे भूमीपुजन

पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रभाग ७९ मध्ये ७ मार्च रोजी विविध कामांचे भूमीपुजन

‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहीम पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

नवी मुंबईत आज १०१ कोरोना रूग्ण, एकाचा कोरोनाने मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com