• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 18, 2021

रस्त्यावर साचणारे पाणी, पदपथावरील मातीचे ढिगारे हटवा : महादेव पवार

adminbyadmin
in Uncategorized
0
रस्त्यावर साचणारे पाणी, पदपथावरील मातीचे ढिगारे हटवा : महादेव पवार

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

नवी मुंबई :  नेरूळ सेक्टर ६ मधील सिडको वसाहतीमधील एव्हरग्रीन व वरूणा सोसायटीच्या समोरील रस्त्यावर साचून राहणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याची तसेच वरूणा सोसायटीलगत असणाऱ्या मैदानाकडील पदपथावर असलेले मातीचे ढिगारे तात्काळ हटविण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

महापालिका प्रभाग ८५ मधील नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडको वसाहतीमध्ये एव्हरग्रीन सोसायटी व वरूणा सोसायटीच्या समोरील रस्त्यावर काही भाग समांतर नसल्याने त्या ठिकाणी पाणी साचून राहते. पाण्याचा निचरा होत नाही. पावसाळा सुरू झाल्यापासून तेथील रहीवाशांना डासांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाणी साचून राहत असल्याने नागरिकांना त्याच ठिकाणाहून ये-जा करावी लागत आहे. रहीवाशांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागण्याची भीती आहे. आपण पाणी साचत असल्याने रस्त्याची डागडूजी करून पाणी साचणार नाही याबाबत आपण संबंधितांना निर्देश देवून युध्दपातळीवर काम  करण्याची मागणी महादेव पवार यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

नेरूळ सेक्टर ६ मधील वरूणा सोसायटीच्या संरक्षक भिंतीलगतच मैदानाच्या बाजूने असलेल्या पदपथावर मोठ्या प्रमाणावर मातीचे ढिगारे लांबवर पडलेले आहेत. त्या पदपथावरून दोन माणसांनाही ये-जा करता येत नाही. त्यातच पाऊस सुरू असल्याने मातीचा चिखल झाला आहे. लोकांना त्या ठिकाणाहून ये-जा करताना चिखलाचा व दुर्गधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणचे मातीचे ढिगारे हटविल्यास स्थानिकांना तेथून ये-जा करण्यास त्रास होणार नाही. स्थानिकांची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी संबंधितांना ते मातीचे ढिगारे हटविण्याचे आदेश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

२४ जून रोजी भूमीपुत्र आपल्या आराध्य दैवतासाठी घालणार सिडकोला हजारोंच्या संख्येने घेराव

Next Post

गाढेश्वर धरण, कुंडी धबधबा, वारदोली धबधब्यावर जाण्यास बंदी

Next Post
गाढेश्वर धरण, कुंडी धबधबा, वारदोली धबधब्यावर जाण्यास बंदी

गाढेश्वर धरण, कुंडी धबधबा, वारदोली धबधब्यावर जाण्यास बंदी

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

नवी मुंबईत आज कोरोनाचे १३५ रूग्ण, ७ मृत्यू

सोमवारी सकाळी ६.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त देशाला संबोधित करणार

सोमवारी सकाळी ६.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त देशाला संबोधित करणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com