• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 15, 2021

पाणीपुरवठ्याची समस्या दूर न झाल्यास विभाग अधिकारी कार्यालयावर २६ एप्रिलला बिसलेरी मोर्चा : मनोज मेहेर

adminbyadmin
in Uncategorized
0
वनविभाग व कांदळवनाच्या माध्यमातून सारसोळे ग्रामस्थांच्या रोजगार-व्यवसायासाठी मनोज मेहेर प्रयत्नशील

नवी मुंबई : सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्याची समस्या दूर न झाल्यास महापालिकेच्या नेरूळ  विभाग अधिकारी कार्यालयावर बिसलेरी मोर्चा काढणार असल्याचा इशारा महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य आणि सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी नेरूळ विभाग अधिकाऱ्यांना लेखी निवेदनातून दिला आहे. यासंदर्भात मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनाही निवेदन देवून कमी दाबाच्या पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी केली आहे.

सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर ६ परिसरात गेल्या दीड महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण असतानाही सारसोळेच्या ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर ६ च्या रहीवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. रात्री पालिका प्रशासनाकडून ३ तास पाणी येत असे, आता जेमतेम एक तासच पाणी येत आहे. बायपास लाईनला सर्वात जास्त पाणीपुरवठा कमी येत आहे. दोन दिवसापासून जलकुंभाच्या (टाकीच्या) लाईनकडूनही पाणीपुरवठा कमी दाबाने होवू लागला आहे. कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे घरात राहणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने पाणी कमी पडू लागले आहे. २४ तास पाणी यामुळे घरातील हंडे नामशेष झाले आहेत.  २५ एप्रिलपर्यत या समस्येचे निवारण न झाल्यास कोरोनाबाबतीत महापालिका प्रशासनाने आखून दिलेल्या सर्वच नियमांचे पालन करून २६ एप्रिलला नेरूळ विभाग अधिकारी कार्यालयावर स्थानिक रहीवाशांचा मोर्चा काढण्याचा इशारा मनोज यशवंत मेहेर यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

Previous Post

कंटेंन्मेंट झोन व इतर भागात अँटिजेन टेस्ट कराव्यात : सुहासिनी नायडू

Next Post

शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक मदत द्या !: नाना पटोले

Next Post
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचे समर्थन : नाना पटोले

शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक मदत द्या !: नाना पटोले

कोव्हीशील्डचा आणखी 20 हजार लसींचा साठा प्राप्त

कोव्हीशील्डचा आणखी 20 हजार लसींचा साठा प्राप्त

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

आज नवी मुंबईत कोरोनाचे ८२१ नवे कोरोनाचे रूग्ण, ८ मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com