• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, August 31, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 31, 2026

जश्नही हो, अमनही हो आणि सफाईही हो; सार्वजनिक निधी जनसुविधांसाठी वापरा : हाजी शाहनवाज खान

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com

मोठे उत्सव, मोठी जबाबदारी

ईद-ए-मिलादसह सर्व सार्वजनिक उत्सवांच्या आयोजनात स्वच्छता

सार्वजनिक सुविधा आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन

मुंबई : मोठ्या सार्वजनिक उत्सवांच्या आयोजनादरम्यान नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने प्रशासनाने सार्वजनिक निधीचा वापर केवळ सजावटीसाठी न करता स्वच्छता, सार्वजनिक शौचालये, कचरापेट्या, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि वाहतूक व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी प्राधान्याने करावा, असे आवाहन ऑल इंडिया उलमा बोर्डच्या महाराष्ट्र कोअर कमिटी, कोकण विभाग, महाराष्ट्र व गोवा यांच्या वतीने हाजी शाहनवाज खान यांनी केले आहे.

मुंबई, नवी मुंबई, पनवेल तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ईद-ए-मिलाद जुलूस, दहीहंडी, गणेशोत्सव, ईद आणि अन्य मोठ्या सार्वजनिक उत्सवांच्या वेळी हजारो नागरिक रस्त्यावर एकत्र येतात. अशा वेळी नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच उत्सवाच्या ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षितता राखणे ही प्रशासनासोबतच आयोजक आणि नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे हाजी शाहनवाज खान यांनी नमूद केले.

सजावटीपेक्षा जनसुविधांना प्राधान्य

मोठ्या उत्सवांसाठी सार्वजनिक निधी खर्च करताना त्याचा योग्य आणि जनहिताचा वापर होणे आवश्यक आहे. उत्सवांच्या मार्गांवर पुरेशा कचरापेट्या उपलब्ध करून देणे, गरजेनुसार फिरती सार्वजनिक शौचालये उभारणे, नियमित कचरा संकलन करणे, सुरक्षा व्यवस्था वाढविणे, वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे आणि वाहतूक नियोजन प्रभावी करणे, याकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी हाजी शाहनवाज खान यांनी केली.

जुलूस अथवा उत्सवाच्या मार्गावर गर्दीच्या काळात दर एक ते दोन तासांनी स्वच्छता आणि कचरा संकलनाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर संपूर्ण मार्गाची विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, असेही त्यांनी सुचविले.

‘स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी’

“इस्लाम आपल्याला स्वच्छता आणि पावित्र्याचा संदेश देतो. त्यामुळे ईद-ए-मिलाद असो किंवा कोणताही सार्वजनिक उत्सव, स्वच्छता राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,” असे हाजी शाहनवाज खान यांनी स्पष्ट केले.

उत्सव साजरा करताना नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, सार्वजनिक ठिकाणी कचरा साचू नये आणि कार्यक्रमानंतर परिसर पूर्ववत स्वच्छ करण्यात यावा, यासाठी प्रशासन आणि आयोजकांनी संयुक्तपणे नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

प्रशासन, आयोजक आणि नागरिकांनी एकत्र यावे

दहीहंडी, गणेशोत्सव, ईद, ईद-ए-मिलादचा जुलूस किंवा कोणताही मोठा सार्वजनिक उत्सव असो, “उत्सवाचा आनंदही हवा, शांतताही हवी आणि स्वच्छताही हवी,” असा संदेश हाजी शाहनवाज खान यांनी दिला.

प्रशासन, उत्सव आयोजक, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम केल्यास स्वच्छ, सुरक्षित आणि जबाबदार उत्सवाचे आयोजन शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सार्वजनिक निधी हा जनतेच्या सुविधांसाठी असतो. त्यामुळे उत्सवांच्या काळात उपलब्ध निधीचा वापर नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांसाठी प्रभावीपणे व्हावा, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक नियोजन करावे, असे आवाहन हाजी शाहनवाज खान यांनी केले.

ऑल इंडिया उलमा बोर्डच्या महाराष्ट्र कोअर कमिटी – कोकण विभाग, महाराष्ट्र व गोवा यांच्या वतीने करण्यात आलेल्या या आवाहनातून उत्सव साजरे करताना सामाजिक जबाबदारी, स्वच्छता आणि जनहिताला प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला आहे.

Previous Post

महिलांच्या हाती एनएमएमटीचे स्टेअरिंग; महापौर सुजाताताई पाटील यांचा सक्षमीकरणाचा ‘मंगळागौर’ संकल्प

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com