• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, September 4, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 4, 2026

आशेच्या चाकांपासून उद्दिष्टपूर्तीपर्यंत : शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून चित्रलेखा पाटील यांची तळागाळातील परिवर्तनाची वाटचाल

adminbyadmin
in देश - विदेश
0
आशेच्या चाकांपासून उद्दिष्टपूर्तीपर्यंत : शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून चित्रलेखा पाटील यांची तळागाळातील परिवर्तनाची वाटचाल

‘पेडल्स ऑफ होप’ आणि ‘प्रोजेक्ट दृष्टी’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून चित्रलेखा पाटील ग्रामीण भारतातील शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यासोबतच महिलांना सक्षम करण्याचे कार्य करत आहेत. साध्या आणि परिणामकारक हस्तक्षेपांमधून दीर्घकालीन सामाजिक परिवर्तन घडवून आणता येते, हे त्यांच्या कार्यातून सिद्ध होते.

भारतामधील ग्रामीण शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सातत्याने परिवर्तन होत आहे. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार, भारतातील महिला साक्षरतेचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक झाले आहे. मात्र, ग्रामीण भागातील मुलींच्या शाळा सोडण्याचे प्रमाण अजूनही चिंतेचा विषय आहे. शिक्षणाची अपुरी उपलब्धता, प्रवासाच्या अडचणी आणि सामाजिक-सांस्कृतिक अडथळे यामुळे अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.

त्याचवेळी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) आधारित उपक्रम आणि समुदायाच्या सहभागातून राबवले जाणारे विकासाचे मॉडेल ग्रामीण भागातील या दरी भरून काढण्यासाठी आणि दीर्घकालीन, शाश्वत परिणाम घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

स्टार्टसअप टॉल्कीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ विशेष मालिकेअंतर्गत, आम्ही श्रीमती चित्रलेखा पाटील यांच्याशी संवाद साधला. ‘पेडल्स ऑफ होप’ आणि ‘प्रोजेक्ट दृष्टी’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून त्या तळागाळातील पातळीवर अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणत आहेत. त्यांच्या कार्यातून हे स्पष्ट होते की, योग्य उद्देशाने आणि व्यापक स्वरूपात राबवलेले साधे उपक्रम ग्रामीण भारतातील शिक्षणाची उपलब्धता, महिलांचे नेतृत्व आणि समुदाय विकासामध्ये मोठे परिवर्तन घडवू शकतात.

 000

अलिबाग तालुक्यातील १ हजार ग्रामीण विद्यार्थ्यांना सक्षम करणाऱ्या ‘पेडल्स ऑफ होप’ मोहिमेमागची प्रेरणा काय होती?

श्रीमती चित्रलेखा पाटील: अलिबाग तालुक्यातील गावांमध्ये काम करत असताना आम्हाला एक साधी पण महत्त्वाची गोष्ट जाणवली. अनेक मुले शाळेत जाण्यासाठी दररोज ३ ते ५ किलोमीटरपर्यंतचे अंतर पायी चालत जात होती. त्यामुळे त्यांच्या शाळेतील उपस्थितीवर परिणाम होत होता आणि काही वेळा विशेषतः मुलींमध्ये शाळा सोडण्याची परिस्थिती निर्माण होत होती.

आम्हाला जाणवले की, सायकल हा एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतो. त्यामुळे ज्या कुटुंबांना सायकल घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हते, अशा विद्यार्थ्यांना आम्ही सायकली उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली.

आतापर्यंत ४० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या आहेत. याचा परिणाम तातडीने जाणवला—विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढली, त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि मुलींमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण झाली.

एखादी साधी सायकलसुद्धा मुलाच्या किंवा मुलीच्या शैक्षणिक प्रवासात खऱ्या अर्थाने मोठा बदल घडवून आणू शकते.

 000

महिलांकडे केवळ सहभागी म्हणून न पाहता व्यवसाय, समुदाय विकास आणि सार्वजनिक जीवनातील नेतृत्व करणाऱ्या संस्था-निर्मात्या म्हणून हा उपक्रम त्यांच्याकडे कसा पाहतो?

श्रीमती चित्रलेखा पाटील: सीएफटीआयमध्ये आम्ही महिलांकडे केवळ सहभागी म्हणून पाहत नाही, तर नेते आणि संस्था उभारणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहतो. महिलांना योग्य पाठबळ आणि संधी मिळाल्या की त्या स्वाभाविकपणे नेतृत्वाची भूमिका स्वीकारतात.

आमच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही महिलांना बचत गटांचे नेतृत्व करण्यासाठी, छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि समुदायाच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करतो.

कालांतराने आम्ही महिलांमध्ये मोठा बदल पाहिला आहे. सुरुवातीला शांतपणे सहभागी होणाऱ्या महिला आता आत्मविश्वासपूर्ण नेतृत्वकर्त्या बनल्या आहेत. त्या स्वतःच्या गावात परिवर्तन घडवून आणण्याबरोबरच इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

खरे सांगायचे तर, सीएफटीआयमधील माझ्या टीममधील बहुसंख्य सदस्य महिलाच आहेत आणि त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयातून त्यांचे सक्षमीकरण होताना पाहणे मला खूप आनंद देते.

 000

विशेषतः ग्रामीण महिलांसाठी शाश्वत विकास आणि दीर्घकालीन सामाजिक परिणाम घडवून आणण्यासाठी उद्योग-आधारित मॉडेल कशी भूमिका बजावू शकतात?

श्रीमती चित्रलेखा पाटील:
उद्योग किंवा व्यवसायामुळे दीर्घकालीन परिवर्तन घडते, कारण त्यातून स्वावलंबन निर्माण होते. महिला शिवणकाम, खानावळ किंवा केटरिंगसारखे छोटे व्यवसाय सुरू करतात, तेव्हा त्यांच्या कुटुंबात नियमित उत्पन्न येऊ लागते. त्यामुळे केवळ आर्थिक स्थैर्यच सुधारत नाही, तर त्यांचा आत्मविश्वास आणि कुटुंबातील निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते.

यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळते. आमच्यासाठी शाश्वत विकास म्हणजे समुदायांना कायम मदतीवर अवलंबून ठेवणे नव्हे, तर त्यांना स्वावलंबी बनवणे.

000

ग्रामीण महाराष्ट्रातील महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणात शिक्षणाची काय भूमिका आहे? या उपक्रमातून आतापर्यंत कोणते परिणाम दिसून आले आहेत?

श्रीमती चित्रलेखा पाटील:
ग्रामीण महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना सक्षम करण्यासाठी शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. शिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो, निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेच्या संधी निर्माण होतात. मुलींनी शाळेत जावे, शिक्षणात टिकून राहावे आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करावे यासाठी सीएफटीआय अशा विविध कार्यक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी करते, ज्यातून मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.

यामध्ये वाहतुकीची समस्या, सुरक्षितता आणि शैक्षणिक साधनांची उपलब्धता यांसारख्या अडचणींचा समावेश आहे.

या हस्तक्षेपांमुळे सीएफटीआयने मुलींच्या शाळेतील उपस्थितीत, शिक्षणातील सातत्यात आणि मुलींच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी असलेल्या समुदायाच्या पाठिंब्यात सकारात्मक सुधारणा घडवून आणली आहे.

कालांतराने या बदलांमुळे अधिक समानताधिष्ठित समाज निर्माण होण्यास मदत होईल. मुलींना लग्नाचा निर्णय पुढे ढकलता येईल, त्यांना उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहता येतील आणि महिला आपल्या समुदायाच्या प्रगतीमध्ये अधिक सक्रिय व प्रभावी भूमिका बजावू शकतील.

दीर्घकाळात अशा प्रयत्नांमुळे बालविवाह आणि लवकर होणाऱ्या विवाहांमध्ये घट, मुलींच्या आकांक्षांमध्ये वाढ आणि समुदाय विकासामध्ये महिलांचा अधिक सक्रिय सहभाग असे व्यापक सामाजिक बदल घडून येतात.

 000

‘पेडल्स ऑफ होप’ आणि ‘प्रोजेक्ट दृष्टी’सारखे सीएसआर उपक्रम तळागाळातील महिलांसाठी अर्थपूर्ण आणि मोजता येण्याजोगे परिवर्तन कसे घडवू शकतात?

श्रीमती चित्रलेखा पाटील: ‘प्रोजेक्ट दृष्टी’ आणि ‘पेडल्स ऑफ होप’सारखे कार्यक्रम तळागाळातील पातळीवर गरजेनुसार केलेल्या लक्षित हस्तक्षेपांचा मोजता येण्याजोगा परिणाम कसा होऊ शकतो, हे दाखवून देतात.

‘पेडल्स ऑफ होप’च्या माध्यमातून वाहतुकीच्या अडचणींमुळे नियमितपणे शाळेत जाण्यात अडथळे येणाऱ्या मुलींना सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळते. त्यामुळे त्या नियमितपणे शाळेत जाऊ शकतात आणि शिक्षण अर्धवट सोडण्याची शक्यता कमी होऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी वाढते.

‘प्रोजेक्ट दृष्टी’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि प्रामुख्याने वृद्ध महिलांना चष्मे उपलब्ध करून देणे तसेच मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करून दृष्टी पुनर्स्थापित करण्याचे कार्य केले जाते.

हे दोन्ही उपक्रम समुदायासोबत काम करून गरजेनुसार आणि लक्ष्यित कार्यक्रम विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यातून शिक्षणाची उपलब्धता वाढते, व्यक्तीची प्रतिष्ठा जपली जाते आणि महिला व मुलींसाठी दीर्घकालीन संधी निर्माण होतात.

000 

ग्रामीण भागात शिक्षण आणि सक्षमीकरणाचे कार्यक्रम राबवताना कोणत्या अडचणी आल्या आणि त्या कशा दूर केल्या?

श्रीमती चित्रलेखा पाटील:ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या अडचणींपैकी एक म्हणजे विश्वास निर्माण करणे आणि जनजागृती करणे. काही वेळा कुटुंबे विशेषतः मुलींच्या शिक्षणाबाबत किंवा महिलांनी नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्याबाबत साशंक असतात. आमचा दृष्टिकोन नेहमीच समुदायासोबत जवळून काम करण्याचा राहिला आहे. आम्ही गावातील नेते, शिक्षक आणि कुटुंबीयांना या प्रक्रियेत सहभागी करून घेतो.

जेव्हा लोकांना प्रत्यक्ष परिणाम दिसू लागतात. मुले शिक्षण सुरू ठेवतात, महिला उत्पन्न मिळवू लागतात, तेव्हा हळूहळू मानसिकता बदलू लागते.

विकासाची प्रक्रिया तेव्हाच सर्वाधिक प्रभावी ठरते, जेव्हा समुदाय स्वतः त्या प्रक्रियेचा भागीदार बनतो.

 000

या भागीदारीचे दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे? शिक्षण आणि समुदाय विकासाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा प्रभाव व्यापक पातळीवर नेण्यासाठी तुम्ही काय योजना आखत आहात?

श्रीमती चित्रलेखा पाटील: ‘पेडल्स ऑफ होप’ आणि ‘प्रोजेक्ट दृष्टी’सारख्या केंद्रित आणि लक्षित मोहिमांच्या माध्यमातून तळागाळातील पातळीवर प्रत्यक्ष परिवर्तन घडवून आणता येते, हे आम्ही अनुभवले आहे. विशिष्ट आणि मार्गदर्शित पद्धतीने काम केल्यास संबंधित लाभार्थ्यांच्या जीवनात ठोस आणि मोजता येण्याजोगा बदल घडवून आणता येतो.

‘पेडल्स ऑफ होप’च्या माध्यमातून अनेक मुला-मुलींना सकारात्मक परिणाम मिळाला आहे. विशेषतः ज्या मुलींना शाळेत जाण्यासाठी सुरक्षित वाहतुकीची कोणतीही सुविधा किंवा साधन उपलब्ध नव्हते, त्यांना आता शाळेत सुरक्षितपणे जाता येते. त्यामुळे त्यांची शाळेतील उपस्थिती नियमित होण्यास आणि पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची शक्यता वाढण्यास मदत होते.

दुसरीकडे, ‘प्रोजेक्ट दृष्टी’ चष्मे किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेद्वारे दृष्टी पुनर्स्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करतो. यामुळे ग्रामीण समुदायातील मुले आणि महिलांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होते.

या दोन्ही उपक्रमांमधून हे स्पष्ट होते की, समुदायाच्या सहभागातून गरजेनुसार आणि लक्षित पद्धतीने राबवलेले कार्यक्रम शिक्षणाची उपलब्धता वाढवू शकतात, व्यक्तीची प्रतिष्ठा जपू शकतात आणि महिला व मुलींसाठी दीर्घकालीन फायदे निर्माण करू शकतात. हीच आमच्या कामाची खरी दिशा आहे—साध्या उपायांना योग्य उद्देश, समुदायाचा सहभाग आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड देऊन तळागाळात दीर्घकालीन परिवर्तन घडवून आणणे.

Previous Post

‘मित्रों’च्या फायद्यासाठी महाग वीज कशासाठी?: नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com