१७ सप्टेंबरच्या जंतरमंतर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हाजी शाहनवाझ खान यांचे शांततापूर्ण आवाहन
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी दिल्ली : १७ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या वतीने नागरिकांना शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने आपली भूमिका मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र–गोवा कोअर कमिटी तसेच नॅशनल महाराष्ट्र, कोकण विभाग आणि गोवा यांच्या वतीनेही या आवाहनाला पाठिंबा देण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हाजी शाहनवाझ खान यांनी नागरिकांनी कायदा आणि संविधानाचा आदर राखत शांततेच्या मार्गाने आपल्या हक्कांची व उद्दिष्टांची मांडणी करण्याचे आवाहन केले आहे. आपले प्रश्न आणि मागण्या मांडताना शांतता, न्याय आणि संविधानिक मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या हक्कांसाठी आवाज उठवताना कोणत्याही प्रकारची अशांतता किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार असून, हा अधिकार कायदेशीर आणि शांततापूर्ण पद्धतीने बजावणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
१७ सप्टेंबर रोजी जंतरमंतर येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि नागरिकांनीही जागरूक राहावे, तसेच कार्यक्रमात सहभागी होताना कायदा व संविधानाच्या चौकटीचे पालन करावे, असे आवाहन हाजी शाहनवाझ खान यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
“आवाज पुर-शांत असावा, उद्देश स्पष्ट असावा आणि मार्ग संविधानिक असावा,” या भूमिकेवर भर देत कार्यक्रम शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

