• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 27, 2016

स्वतंत्र विदर्भासाठी मुंबईत मोर्चा

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
स्वतंत्र विदर्भासाठी मुंबईत मोर्चा
  • मुंबई :- राज्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भासाठी मुंबईत राणीबाग ते आझाद मैदान असा पहिला धडक मोर्चा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने काढल्याचा दावा केला आहे. बुधवारी काढलेल्या मोर्चाचे रूपांतर आजाद मैदानात जाहीर सभेत झाले. या वेळी अ‍ॅड. सुरेश माने यांनी सरकारवर टीका करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

    माने म्हणाले की, स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन देत भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली. मात्र, ते आश्वासन पूर्ण करण्याऐवजी सरकार कारणे देत आहे. छोट्या राज्याच्या रूपात विदर्भाचा विकास व्हावा, एवढी माफक अपेक्षा आहे. विदर्भ मागासलेला आहे, म्हणून विकासाचा अनेक क्षेत्रांत अनुशेष बाकी आहे. मात्र, मराठवाडा तर अति मागासलेला असून, रोजगार नियोजन, जलव्यवस्थापन, उद्योग व वीज, रस्ते, शेतीपंप अशा विविध सुविधांपासून मराठवाड्यातील लोक वंचित आहेत. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाप्रमाणे लवकरच स्वतंत्र मराठवाड्याची मागणी होण्यासाठी मराठवाडा आर्थिक विकास कार्यक्रम राबवण्याची मागणी त्यांनी केली.

    मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे, प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याची मागणी माने यांनी केली. तसे शक्य नसल्यास १५ लाख रुपयांपर्यंतचे सामान्य नागरिकांचे कर्ज माफ करा, असेही ते म्हणाले. याशिवाय सच्चर समिती, प्रा. कुंडू समिती, रहेमान समिती आणि रंगनाथ मिश्रा समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली.

    …………………

    या मोर्चात धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, आवामी विकास पार्टीचे अध्यक्ष समशेर खान पठाण, निवृत्ती ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि हजारो कार्यकर्ते सामील झाले होते. तरी सोमवारी संगणक परिचालकांनी सीएसटी येथे केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे, राणीबाग येथून मोर्चा काढण्यास आयोजकांना पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे भायखळा पोलिसांनी मोर्चाला अटकाव केला. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयोजकांसोबत चर्चा करत मोर्चा काढण्यास परवानगी दिली.

Previous Post

ऐरोली खुलेआमपणे होत आहे वृक्षतोड

Next Post

विरार लोकलमध्ये महिलांची दादागिरी

Next Post
विरार लोकलमध्ये महिलांची दादागिरी

विरार लोकलमध्ये महिलांची दादागिरी

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानची निर्दोष सुटका

सलमान पुन्हा अडचणीत ? ड्रायव्हर म्हणतो सलमाननेच केली चिंकाराची शिकार

खड्डे बुजवा नाहीतर खुर्च्या पळवू, मनसेचा PWD अधिकाऱ्यांना इशारा

खड्डे बुजवा नाहीतर खुर्च्या पळवू, मनसेचा PWD अधिकाऱ्यांना इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com