नवी मुंबई : सानपाडा सेक्टर २,३,४,५,६,७,८,९,११,३० आणि सानपाडा गावामध्ये धुरीकरण अभियान राबविण्याची लेखी मागणी भाजपचे नवी मुंबई जिल्हा सचिव पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे केली आहे.
सानपाडा कार्यक्षेत्रातील सेक्टर २,३,४,५,६,७,८,९,११,३० आणि सानपाडा गावामध्ये डासांची समस्या वाढीस लागली आहे. डासांमुळे सकाळी व संध्याकाळी लोकांना दरवाजे-खिडक्या बंद करुन घरात बसण्याची वेळ आलेली आहे. सोसायटी आवारात, उद्याने व अन्य सार्वजनिक ठिकाणी डासांमुळे फिरणे अवघड झाले आहे. त्यातच पाऊस लांबणीवर पडल्याने डासांच्या घनतेतही वाढ झालेली आहे. साथीच्या आजारातही वाढ झालेली आहे. दवाखाने, रुग्णालयात ताप, मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण पहावयास मिळत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने डासांची समस्या नियत्रंणात आणण्यासाठी अथवा संपुष्टात आणण्यासाठी सेक्टर २,३,४,५,६,७,८,९,११,३० आणि सानपाडा गाव परिसरातील अंर्तगत व बाह्य भागात तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत आवारातही धुरीकरण अभियान व्यापक प्रमाणावर सातत्याने राबविण्याची पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.



