• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, March 14, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 14, 2026

अॅट्रोसिटीमध्ये गुन्हा सिद्ध झाल्यावरच अटक : संजय शिरसाट

adminbyadmin
in मुंबई
0
अॅट्रोसिटीमध्ये गुन्हा सिद्ध झाल्यावरच अटक : संजय शिरसाट

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : अॅट्रोसिटी कायद्याचा पूर्वी गैरवापर होत असे, त्यामुळे या कायद्यात महत्त्वाचे बदल करण्यात आले असून आता एफआयआर दाखल झाल्यावर तातडीने अटक न करता आधी समितीमार्फत चौकशी होईल आणि गुन्हा सिद्ध झाला तरच अटक केली जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री तथा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी विधानपरिषदेत दिली. कोणावरही विनाकारण अन्याय होऊ नये, हा या बदलामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिरसाट यांनी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, पूर्वी अॅट्रोसिटीचे गुन्हे सर्रासपणे दाखल केले जायचे. एखाद्याने शिवी दिली असे म्हणून जरी पोलीस ठाण्यात गेले तरी आरोपीवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हायचा. गुन्हा दाखल झाल्यावर २४ तासांच्या आत अटक करण्याचा नियमही होता आणि त्यानुसार काही ठिकाणी अटकाही व्हायच्या. या कायद्याचा काही प्रमाणात गैरवापर झाल्याचे नाकारता येत नाही, हे शिरसाट यांनी मान्य केले.

गुन्हा सिद्ध झाला तरच अटक

बदललेल्या कायद्यानुसार आता एफआयआर नोंदवता येईल, मात्र अटक करण्यापूर्वी तपास अधिकारी (आयओ) संपूर्ण खात्री करेल. चौकशीत गुन्हा चुकीचा आढळल्यास तपास अधिकारी कलम १६९ नुसार समरी देतो. त्यानंतर न्यायालयात प्रकरण आल्यावर ही समरी जोडली जाते आणि केस मागे घेतली जाते. थोडक्यात, गुन्हा सिद्ध झाला तरच अटक होईल, अन्यथा एफआयआर रद्द होतो, अशी नवी प्रक्रिया लागू करण्यात आली आहे.

खोट्या तक्रारी करणारे अडचणीत येणार

शिरसाट पुढे म्हणाले की, अन्याय झाला असेल तर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मात्र खोट्या तक्रारी करणाऱ्यांवरही कायद्यात काही तरतूद करता येईल का, याचाही शासन विचार करेल. तातडीने अटक करण्याची जी पद्धत होती ती आता थांबवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची  पगारवाढ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com