• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, February 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 4, 2020

महाविकास आघाडीच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेकडून ‘अभय योजना’ जाहिर

adminbyadmin
in Uncategorized
0
महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची इंटकची मागणी

नवी मुंबई : मालमत्ताकर थकबाकीदारासाठी महापालिकेने ‘अभय योजना’ जाहिर केली आहे. १५ डिसेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१दरम्यान ही योजना असणार असून थकबाकीदारांना दंडात्मक रकमेवर ७५ टक्केपर्यत सवलत देण्यात येणार आहे. महाविकास आघाडीने मालमत्ता कराबाबत अभय योजनेसाठी महापालिका ते मंत्रालयादरम्यान पाठपुरावा केल्यामुळेच नवी मुंबईकरांसाठी महापालिका प्रशासनाला  अभय योजना लागू करणे  भाग पडले असल्याचा दावा कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केला आहे.

गेल्या वर्षी महापालिका सभागृहात नवी मुंबईकरांना थकीत मालमत्ताकराचा भरणा  सुलभपणे करता यावा व महापालिकेच्या तिजोरीतही भर पडावी यासाठी कॉंग्रेसचेप्रदेश चिटणीस संतोष शेट्टी व कॉंग्रेसचे नवी मुंबई प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांकडे व विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्याकडे पाठपुरावा करून थकीत मालमत्ता कराबाबत नवी मुंबईकरांना दिलासा देण्याची मागणी केली. त्यानंतर कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. मिरा पाटील यांनी महापालिका सभागृहात आवाज उठविला  होता. आयुक्तांकडेही आपले म्हणणे मांडले होते.  त्यानंतर महापालिका प्रशासनाने अभय योजना लागू केली. तथापि कोरोनाचे सावट सुरू झाल्यानंतर या अभय योजनेचा नवी मुंबईकरांना पूर्णपणे लाभ घेता आला नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांना थकीत मालमत्ताकराचा भरणा करता यावा यासाठी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देवून पुन्हा अभय योजना लागू करण्याची मागणी केली होती. रवींद्र सावंत यांनी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणिस संतोष शेट्टी यांच्यासमवेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटिवार, नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला.

महापालिका प्रशासनाने अभय योजना लागू केल्यामुळे नवी मुंबईकरांना मालमत्ता कराचा भरणा करण्यास दिलासा मिळणार असून महाविकास आघाडीच्या घटकांनी पाठपुरावा केल्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी सांगितले.

Previous Post

जनतेची नि:स्वार्थीपणे कामे करण्याच्या सेवाभावाची गरज : नामदेव भगत

Next Post

राजमाता जिजाऊ उद्यान व तानाजी मालुसरे क्रिडांगणात नवीन डेकोरेटिव्ह फिटींग बसवण्याची मनोज मेहेरची मागणी

Next Post
राजमाता जिजाऊ उद्यान व तानाजी मालुसरे क्रिडांगणात नवीन डेकोरेटिव्ह फिटींग बसवण्याची मनोज मेहेरची मागणी

राजमाता जिजाऊ उद्यान व तानाजी मालुसरे क्रिडांगणात नवीन डेकोरेटिव्ह फिटींग बसवण्याची मनोज मेहेरची मागणी

जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा : सचिन सावंत

...आणि रॉबर्टसेठचा दणदणीत पराभव झाला! सचिन सावंत

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र काँग्रेसचा पाठिंबा!: बाळासाहेब थोरात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com