• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 25, 2026

एलआयजीच्या घरांसाठी मनसेचा सभागृहात लढा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
एलआयजीच्या घरांसाठी मनसेचा सभागृहात लढा

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ नोडसह नवी मुंबई शहरामध्ये असलेल्या श्रमिकांच्या घरांचा अर्थांत एलआयजीच्या घरांबाबत मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सातत्याने आवाज उठविलेला आहे. एलआयजीच्या घराबाबतचा मनसेचा आवाज आता महापालिका सभागृहातही मनसेचे प्रथम नगरसेवक अभिजित देसाई यांच्या माध्यमातून सुरु झाल्याचे महासभेत पहावयास मिळाले.

नगरसेवक अभिजित देसाई यांनी महासभेत एलआयजीच्या घरांचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेने हा मुद्दा उपस्थित केला नसून महापालिका सभागृहातही त्यासाठी पाठपुरावा होत असल्याचे नवी मुंबईकरांना पहावयास मिळाले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत मनसेच्या वतीने नगरसेवक अभिजित देसाई यांनी आक्रमकपणे एलआयजीमधील रहिवाशांच्या वतीने आवाज उठविला. एलआयजीचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या भावना किती तीव्र आहेत, हे महासभेत कामकाजादरम्यान दाखवून दिले.

सिडकोने एलआयजीच्या रहिवाशांना दिलेली अवघी १४४ चौ. फुटांची घरे दिलेली आहे. आजच्या काळात या घरात एक कुटुंब कसे राहणार? वाढत्या कुटुंबाच्या गरजेपोटी जेव्हा माथाडी कामगार, कष्टकरी माणूस घराचा विस्तार करतो, तेव्हा त्याला ‘अनधिकृत’ ठरवले जाते. शहरातील झोपडपट्ट्या नियमित होतात, मग घाम गाळून घर घेणाऱ्या मध्यमवर्गीयांवरच हा अन्याय का, अशी विचारणा करत नगरसेवक अभिजित देसाई यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले.

एलआयजीच्या घरांचे घरांचे विस्तारीकरण नियमित करा ही बांधकामे चैनीसाठी नाही तर ‘गरजपोटी’ केली आहेत, हे प्रशासनाने लक्षात घ्यावे. मालमत्ता करावर लादलेला हा ३००% दंडाचा बोजा सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणारा आहे. हा दंड त्वरित माफ झालाच पाहिजे! सामान्य नवी मुंबईकरांच्या हक्कासाठी, त्यांच्या डोक्यावरचं छप्पर वाचवण्यासाठी मनसेचा लढा सुरूच राहील, असा इशारा मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई यांनी महासभेत महापालिका प्रशासनाला दिला.

Previous Post

इंडोनेशिया येथे जाणाऱ्या भारताच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करणार नेतृत्व

Next Post

महावितरणने खोदकाम केलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी

Next Post
महावितरणने खोदकाम केलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी

महावितरणने खोदकाम केलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com