• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, March 1, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 1, 2026

टी २० विश्वचषक पावलावर ! संजू सॅमसनच्या वादळी खेळीने वेस्ट इंडिज पराभूत

adminbyadmin
in देश - विदेश
0
टी २० विश्वचषक पावलावर ! संजू सॅमसनच्या वादळी खेळीने वेस्ट इंडिज पराभूत

संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी दिल्ली : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील निर्णायक सामना भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना दोन्ही संघांसाठी क्वार्टर फायनलचा सामना होता. कारण जो संघ जिंकणार तो थेट सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार होता. या महत्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी १९६ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५ गडी राखून विजयाची नोंद केली आहे. भारताकडून संजू सॅमसन हा विजयाचा हिरो ठरला.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९६ धावा करायच्या होत्या. निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघासमोर इतक्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणं मुळीच सोपं काम नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. सलामीला आलेला अभिषेक शर्मा अवघ्या १० धावा करून माघारी परतला. तर इशान किशन देखील १० धावा करून माघारी परतला. कर्णधार सूर्यकुमार यादवकडून या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो अवघ्या १८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसनने मिळून संघाचा डाव सांभाळला. दोघांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. तिलक वर्मा २७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्याने १७ धावांचे योगदान दिले. पण सलामीला आलेला संजू सॅमसन शेवटपर्यंत उभा राहिला. संजूने नाबाद ९७ धावांची खेळी करून भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला.

वेस्ट इंडिजने केल्या १९५ धावा

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने ४ गडी बाद १९५ धावा केल्या. सलामीला आलेल्या शे होपने ३२ धावांचे योगदान दिले. तर रोस्टन चेसने ४० धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी मिळून ६८ धावा जोडल्या. शिमरन हेटमायरला या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली होती. पण तो चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करू शकला नाही. तो २७ धावांवर माघारी परतला. रुथरफोर्डने १४ धावा केल्या. शेवटी फलंदाजी करताना रोमन पॉवेलने नाबाद ३४ आणि जेसन होल्डरने नाबाद ३७ धावा केल्या.

Previous Post

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजला गुरु तेग बहादूर साहिबजीचे नाव

Next Post

सागरी वाहतुकीत महाराष्ट्राची झेप; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना साकार

Next Post
सागरी वाहतुकीत महाराष्ट्राची झेप; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना साकार

सागरी वाहतुकीत महाराष्ट्राची झेप; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना साकार

इंडोनेशिया येथे जाणाऱ्या भारताच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करणार नेतृत्व

आधी जंगलातील बिबटे सांभाळा, मग शिवसेनेच्या वाघांच्या नादी लागा : डॉ. श्रीकांत शिंदे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com