• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, February 12, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 23, 2020

‘नवी मुंबईतील ग्रामस्थांना, प्रकल्पग्रस्तांना मालमत्ता कर, पाणीपट्टी माफ करा’

adminbyadmin
in Uncategorized
0
‘नवी मुंबईतील ग्रामस्थांना, प्रकल्पग्रस्तांना मालमत्ता कर, पाणीपट्टी माफ करा’

अनंतकुमार गवई

सारसोळे गावच्या मनोज मेहेरांची महापौर, आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने नवी मुंबईतील ग्रामस्थांना, प्रकल्पग्रस्तांना महापालिका प्रशासनाने पाणी पट्टी, मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी सारसोळे गावचे युवा ग्रामस्थ आणि कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्तांकडे व महापौरांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

शासकीय गरजेतून नवी मुंबई शहराची निर्मिती झालेली आहे. येथील ग्रामस्थ मासेमारी व भातशेतीवर आपली उपजिविका करत होता. भूसंपादनात ग्रामस्थांची भातशेती हिरावून घेतली गेली. खाडी दूषित झाल्याने व  खाडीवर पुलाची उभारणी झाल्याने मासेमारीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवी मुंबई विकसित झाले, पण येथील ग्रामस्थांचे राहणीमान उंचावण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न  झाले नाही. जमिनी देवून नवी मुंबई वसविण्यात सहकार्य केले, त्याच ग्रामस्थांची परिस्थिती आज भयावह आहे. प्रशासनाकडून ग्रामस्थांना घरटी रोजगार मिळालेला नाही. साडे बारा टक्के योजना पूर्ण करण्यास तब्बल ५ दशके घेतली. आज येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने बेरोजगार आहे. बाहेरून आलेल्यांच्या अनधिकृत चाळी व इतर बांधकामांना अधिकृत करून नियमित केेले जात असतानाच ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर मात्र अतिक्रमणाच्या नावाखाली हातोडा चालविला जात आहे. ग्रामस्थ आज जगण्यासाठी संघर्ष करत आहे. आज महापालिका प्रशासन गेल्या दीड दशकाहून अधिक काळ मालमत्ता कर व पाणी पट्टीत वाढ करत नाही. ही स्तुत्य बाब आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या विकासात ज्यांचे योगदान आहे. ज्यांच्या शेतजमिनी गेल्या. बेरोजगारी  तर आहेच, पण गरजेपोटी बांधलेल्या  घरांवरही हातोडा चालविला जावू लागल्याने बेघर होण्याची वेळ आता आलेली आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासनाकडून नवी मुंबईतील ग्रामस्थांचा, प्रकल्पग्रस्तांचा, मूळ आगरी-कोळी समाजबांधवांचा कोठेतरी गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. नवी मुंबईचे मूळ भुमीपुत्र  असणाऱ्या ग्रामस्थांना मालमत्ता कर व पाणीपट्टीत पूर्णपणे सवलत मिळून तो कायमस्वरूपी  माफ करण्यात यावा अशी मागणी मनोज मेहेर यांनी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, महापौर जयवंत सुतार यांच्याकडे केली आहे.

Previous Post

गृहमंत्र्यांनी मागविला ‘ लालाफिती’त अडकलेल्या पोलिसांच्या गृहसंकुलाचा अहवाल

Next Post

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त नेरूळमध्ये फळवाटप

Next Post
शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त नेरूळमध्ये फळवाटप

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त नेरूळमध्ये फळवाटप

आठ दिवसांत कंञाटी कामगारांना मिळणार १४ महिन्याची थक्कबाकी

आठ दिवसांत कंञाटी कामगारांना मिळणार १४ महिन्याची थक्कबाकी

चला, आपण आपले जीवन कृतज्ञतेच्या भावनेने सजवु या : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

चला, आपण आपले जीवन कृतज्ञतेच्या भावनेने सजवु या : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com