• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 9, 2020

कामगारांना विमाकवच व मृत झाल्यास त्यांना एक कोटीची नुकसान भरपाई व वारसाला नोकरी देण्याची इंटकची मागणी

adminbyadmin
in Uncategorized
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

अॅड. महेश जाधव : ९८२००९६५७३ :Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कामगारांना विमाकवच व दुर्देवाने कोव्हीड-१९ या रोगापासून सेवा बजावताना मृत झाल्यास त्यांना एक कोटीची नुकसान भरपाई व वारसाला  नोकरी देण्याचा निर्णय घेण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासन करत असलेल्या उपाययोजना प्रशंसनीय आहे. कामगार तसेच  अधिकारी करत असलेल्या परिश्रमाची स्तुती करावी तितकी कमीच आहे. कोरोना या जीवघेण्या रोगाविरोधात लढा देणाऱ्या स्थानिक स्वराज्य सेवेमधील अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर परिचारिका व अन्य सर्वच विभागातील कामगारांना केंद्र सरकारने ५० लाख रूपयांपर्यतचे विमा कवच जाहिर केले आहे. आपल्या महापालिकेतील अत्यावश्यक सेवेतील कोणते कामगार त्यात बसतात व कोणते बसत नाही, याची वर्गवारी  करावी. केंद्रातील विमा कवच योजनेचा अत्यावश्यक सेवेतील ठोक मानधनावर आणि पालिका आस्थापनेवरील ज्या कामगारांना केंद्र सरकारच्या विमा कवच योजनेचा  लाभ मिळणार नसेल अशा सर्वच कामगारांसाठी पालिका प्रशासनाने स्वत:च्या पातळीवर विमा कंपनीशी चर्चा करून पालिका प्रशासनाच्या माध्यमातून विमा कवच उपलब्ध करून देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या महापालिका कार्यक्षेत्रात कार्यरत असणार्‍या अत्यावश्यक सेवेतील ठोक मानधनावर आणि पालिका आस्थापनेवरील ज्या कामगारांना आपली सेवा बजावताना कोव्हीड-१९ या रोगापासून दुर्देवाने मृत्यू आल्यास त्यांना एक कोटीची अतिरिक्त नुकसान व  त्यांच्या वारसाला  पालिका प्रशासनाला नोकरी देण्याचा निर्णय जाहिर करावा.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या बायकां-मुलांना, आई-वडीलांना घरी ठेवून ते नवी मुंबईकरांसाठी सेवा  बजावत आहे. अत्यावश्यक सेवा बजावणारा कर्मचारी घरी सुखरूप येईल की नाही याबाबत घरच सध्या साशंक आहेत. त्यातच या कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास संसार उघड्यावर पडण्याची आणि संबंधित कामगारांची बायका-मुले देशोधडीला लागण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य ओळखून अत्यावश्यक सेवा बजावताना कोणी कामगार कोव्हीड-१९ या रोगापासून मृत झाल्यास त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवाराला एक कोटीची नुकसान भरपाई तसेच त्यांच्या वारसाला नोकरी देण्याचा निर्णय कामगार हितासाठी घ्यावा  व तो निर्णय जाहिर करून कामगारांना दिलासा देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.

Previous Post

इंटकच्या पाठपुराव्यामुळे अत्यावश्यक सेवेतील पालिका कामगारांना दैनंदिन भत्ता लागू!

Next Post

कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागणार?

Next Post
शिवसेनेची भूमिका सत्ता संपादनात ठरणार महत्वाची

कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागणार?

डीमार्ट च्या कर्मचाऱ्यांना पोलिसांची बेदम मारहाण

डीमार्ट च्या कर्मचाऱ्यांना पोलिसांची बेदम मारहाण

हजारोंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? : आशिष शेलार

हजारोंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? : आशिष शेलार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com