• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 14, 2020

डीमार्ट च्या कर्मचाऱ्यांना पोलिसांची बेदम मारहाण

adminbyadmin
in Uncategorized
0
डीमार्ट च्या कर्मचाऱ्यांना पोलिसांची बेदम मारहाण

सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत असतानाही पोलिसांच्या कृत्याने रहीवाशांत संताप

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com –

नवी मुंबई : :  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ऑनलाईन पध्दतीने जीवनावश्यक वस्तू एका गृहनिर्माण सोसायटीने डीमार्टमधून मागवून त्याचे वितरण सुरूच होते. यावेळी नेरूळ पोलिसांनी येवून डीमार्टच्या कर्मचाऱ्यांना मुजोरी दाखवित डीमार्टच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली व स्थानिक रहीवाशांशी उध्दट वर्तन केले. नेरूळ सेक्टर ४ मधील पामबीच मार्गालगतच्या अमेय सोसायटी (वाधवा टॉवर) येथे ही घटना घडली.  रहीवाशांमध्ये या घटनेने संताप पसरला असून डीमार्टचे कर्मचाऱ्यांना पोलिसांनी मारलेच का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जावू लागला आहे.

नेरुळ सेक्टर ४ मधील अमेय सोसायटीमधील रहीवाशांनी एकत्र येत डीमार्ट मधून जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा मागितला होता. डीमार्टचा टेम्पो सामान घेऊन सोसायटी आवारात आला असता सामान उतरवतेवेळी नेरूळ पोलिसांनी त्यांना मारहाण केली. सोसायटीचे रहीवाशी बाहेर न जाता सोसायटी आवारातच सोशल डिस्टनसिंग ठेवत सामान खरेदी करत असताना पोलिसांनी ही हाणामारी केली. पोलिसांचे कृत्य सोसायटीच्या सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. सदर घटनेमुळे पोलिसांप्रति स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

·        पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी

कोरोना काळात जीवनावश्यक वस्तू  भेटत नाही. त्यातच पोलिसांनी त्यांना मारहाण केल्यामुळे डीमार्टचे कामगार परत न आल्यास त्यास जबाबदार कोण असणार? रहीवाशांना झालेल्या मानसिक  त्रासाला जबाबदार कोण? स्वत:च्याच सोसायटी आवारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नियमाचे पालन करणाऱ्या रहीवाशांची काय चुक होती? असे विविध प्रश्न उपस्थित करत नवी मुंबई इंटकच अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागणार?

Next Post

हजारोंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? : आशिष शेलार

Next Post
हजारोंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? : आशिष शेलार

हजारोंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? : आशिष शेलार

सारसोळे गावासह नेरूळ सेक्टर सहामध्ये धुरीकरणास महापालिकेकडून टाळाटाळ

सारसोळे गावासह नेरूळ सेक्टर सहामध्ये धुरीकरणास महापालिकेकडून टाळाटाळ

प्रभाग ९६ मध्ये भाजपची ऑनलाईन चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, गायन स्पर्धा

प्रभाग ९६ मध्ये भाजपची ऑनलाईन चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, गायन स्पर्धा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com