• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 10, 2020

कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागणार?

adminbyadmin
in Uncategorized
0
शिवसेनेची भूमिका सत्ता संपादनात ठरणार महत्वाची

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३

मुंबई : करोना विषाणूची साथ आणि त्यानंतर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका राज्य सरकारच्या तिजोरीला बसला आहे. त्यामुळे एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारला १५ ते २० हजार कोटींचे कर्ज काढावे लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

राज्य सरकारवरील कर्जाचा भार आधीच वाढता आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून सर्व उद्योग, व्यवसाय व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. वस्तू व सेवा कर (GST), मुद्रांक शुल्क (Stamp Duty), अबकारी कर (Excise) व परिवहन करांच्या माध्यमातून मिळणारा महसूल पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळं राज्याला जवळपास ४० हजार कोटींचा महसुली तोटा झाला आहे.

मागील वर्षीच्या मार्च महिन्यात राज्याच्या तिजोरीत ४२ हजार कोटींचा महसूल जमा झाला होता. यंदाच्या मार्चमध्ये त्यात तब्बल ६० टक्क्यांची घट झाली आहे. यंदाच्या मार्च महिन्यात सरकारला करांपोटी केवळ १७ हजार कोटी मिळाले आहेत. त्याचप्रमाणे, एप्रिल २०१९ मध्ये राज्याचे महसुली उत्पन्न २१ हजार कोटी होते. यंदाच्या एप्रिलमध्ये म्हणजेच, चालू महिन्यात आतापर्यंत फक्त ४ ते ५ हजार कोटी मिळाले आहेत. ही घट तब्बल ७६ टक्के आहे.

केंद्राकडून येणारा परताना मागील वर्षीपासून कमी होत असून यंदा त्यात आणखी घट झाली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९ च्या जीएसटी परताव्यापोटी राज्याला फक्त १८०० कोटी मिळाले आहेत. आणखी ५ हजार कोटी येणे आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यावर सध्या ५.२ लाख कोटी इतके कर्ज आहे. कर्जाच्या व्याजापोटी महिन्याला ३ हजार कोटी द्यावे लागतात. सध्याचा लॉकडाऊन उठला तरी अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर येण्यासाठी अनेक महिने लागणार आहेत. त्यामुळे राज्याचे महसूल उत्पन्न जेमतेमच राहणार आहे. पुढील ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारचे महसुली उत्पन्न नेहमीच्या तुलनेत अवघे ५० टक्क्यांनी कमी असेल, असा सरकारी अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

Previous Post

कामगारांना विमाकवच व मृत झाल्यास त्यांना एक कोटीची नुकसान भरपाई व वारसाला नोकरी देण्याची इंटकची मागणी

Next Post

डीमार्ट च्या कर्मचाऱ्यांना पोलिसांची बेदम मारहाण

Next Post
डीमार्ट च्या कर्मचाऱ्यांना पोलिसांची बेदम मारहाण

डीमार्ट च्या कर्मचाऱ्यांना पोलिसांची बेदम मारहाण

हजारोंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? : आशिष शेलार

हजारोंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? : आशिष शेलार

सारसोळे गावासह नेरूळ सेक्टर सहामध्ये धुरीकरणास महापालिकेकडून टाळाटाळ

सारसोळे गावासह नेरूळ सेक्टर सहामध्ये धुरीकरणास महापालिकेकडून टाळाटाळ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com