नवी मुंबई : सानपाडा सेक्टर २,३,७,८ परिसरात मूषक नियत्रंण मोहिम राबविण्याची मागणी भाजयुमाचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी युनियनचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा सेक्टर २,३,७,८ परिसरातील रहीवाशी उंदरांच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत. सोसायटी आवारात तसेच सोसायटी आवाराच्या बाहेर असलेल्या वाहनातील वायरी कुरतडणे, घरात दोरीवर वाळत असलेले पकडे कुरतडणे, सोसायटी आवारात बीळ तयार करताना खड्डे करणे यामुळे रहिवाशांना दिलासा देण्यासाठी या परिसरात मूषक नियत्रंण अभियान राबविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.



