• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 24, 2025

महेंद्रशेठ घरत यांनी दुसऱ्यांदा पूर्ण केली कैलास मानसरोवर यात्रा

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
महेंद्रशेठ घरत यांनी दुसऱ्यांदा पूर्ण केली कैलास मानसरोवर यात्रा

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६

नवी मुंबई :  महेंद्रशेठ घरत यांनी यंदा दुसऱ्यांदा कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण केली. १० ऑगस्ट २०२५ रोजी यात्रा सुरु झाली. अतिशय खडतर असणारी कैलास मानसरोवर यात्रा गुरुवारी (ता. २१) त्यांनी पूर्ण केली. हिंदू धर्मात अतिशय पवित्र समजली जाणारी ही यात्रा आहे. ही यात्रा पूर्ण करणाऱ्याला ‘कैलाशी’ असे संबोधले जाते. ही यात्रा अंतिम यात्रा म्हणून समजली जाते. त्यामुळे यापूर्वी त्यांनी २०१८ मध्ये सपत्निक ही यात्रा पूर्ण केली होती. मात्र ‘डोकलाम’ मुद्यावरून २०१८ पासून कैलास मानसरोवर यात्रा बंद होती, परंतु यंदा जूनमध्ये कैलास मानसरोवर यात्रेला परवानगी मिळाल्यानंतर तातडीने ही संधी महेंद्रशेठ घरत यांनी दुसऱ्यांदा साधली.
कैलास मानसरोवर यात्रेत तीन दिवसांच्या अतिशय खडतर अशा कैलाश परिक्रमेचा समावेश होता. दारचिन येथून पहाटे पाच वाजता परिक्रमेला सुरुवात केली आणि यमद्वाराला तीन फेऱ्या मारून कैलाश मानसरोवर परिक्रमेला प्रारंभ केला. त्यानंतर सुंदर नद्या, उंचच उंच बर्फाळ पर्वत, ऊन-पावसाचा खेळ सोसत पहिल्या दिवसाचा १४ किमीचा प्रवास त्यांनी बर्फातून झाला. दक्षिण भागाचे हे दर्शन विलोभनीय होते. देरापूक उत्तरमुखाचे सुंदर दर्शन घेतल्यावर प्रवासाचा ताण कमी झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गौरीकुंडाचे विहंगम दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते. नंदीच्या आकाराचे ते पर्वत पाहून स्वर्गसुखाचा अनुभव आला. त्यानंतर दुसरा दिवस २२ किमी खडतर पर्वत आणि बर्फातून त्यांनी प्रवास केला. त्यानंतर धुतूरपूरला मुक्काम करून तिसऱ्या दिवसाची पहाट उजाडली. तेव्हा त्यांनी ६ किमी आणि १८ हजार फुटांपेक्षा जास्त असा बर्फातून प्रवास सुखरूप केला. या प्रवासात अनेकांना उलट्या होणे, चक्कर येणे,ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे सर्वांना गुदमरल्यासारखे होणे हे सर्रास होत होते. तेव्हा आपल्याला आपली पात्रता काय आहे हे कळते आणि अहंकार गळून पडतो, असे महेंद्रशेठ घरत म्हणतात.
या साऱ्या प्रवासात अतिशय अवघड ट्रेक असल्याने जगभरातून पर्यटक येत असतात. प्रवासात जागोजागी श्वास घेतानाही त्रास होतो, हाडे गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव घेतल्यानंतरच खऱ्या अर्थाने कैलास मानसरोवर यात्रा काय आहे, हे त्यांनाही कळते. त्यामुळे पुनर्जन्माचा अनुभव घेऊनच ‘कैलासी’ घरचा रस्ता धरतात. साधारण ५२ किमीचा कैलास मानसरोवरचा हा महाकठीण प्रवास पर्यटकांना दुसऱ्या जन्माचा अनुभव देतो.
दार्चेन ते देरापूक  या ट्रेकिंगमध्ये कैलास पर्वताच्या उत्तरेकडील भागाचे नयनरम्य दृश्य दिसते जे यात्रेकरूंसाठी एक पवित्र आणि अविस्मरणीय ठरते.
कैलास परिक्रमेचा सर्वोच्च बिंदू असलेला डोल्मा पास ओलांडताना तर मेंदूला झिणझिण्या येतात. तरीही ट्रेकचा सर्वात कठीण, परंतु आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा प्रवास करताना महेंद्रशेठ घरत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धीर सोडला नाही. दरम्यान, महारुद्र अभिषेक, जागोजागी आरती करून ते शिवशंकराचरणी लीन झाले होते. गौरी कुंड आणि एक पवित्र तलाव ओलांडून त्यांनी झुथुलपुक येथे प्रवेश केला. झुथुलपुक ते दार्चेन, सागा येथे गाडीने गेले. त्यानंतर दार्चेनला पुन्हा ट्रेकिंग करण्यात आली. त्यामुळे कैलास परिक्रमा पूर्ण केल्याची भावना, तिबेटी लँडस्केप ओलांडून परत येताना सर्व पर्यटकांना कायम राहिली.
याक हा केसाळ प्राणी, मेंढ्या, जंगली गाढव, हजारो जीव-जंतू, पक्षी,चिमण्या या सुद्धा अतिशय थंड वातावरणात राहतात हे ‘याचि देही याचि डोळा’ कैलास मानसरोवर यात्रेनिमित्त पाहता आले, असे महेंद्रशेठ घरत म्हणतात.
‘अष्टपद’ हे जैन धर्मीयांचे अतिशय महत्त्वपूर्ण तीर्थस्थान आहे. ते कैलास पर्वताच्या जवळ आहे. जैन धर्मात अष्टपद हे भगवान ऋषभदेवाच्या (आदिनाथ) मोक्षाचे (मुक्ती) स्थान मानले जाते. त्यामुळे जैन धर्मीय बांधव ही महत्त्वपूर्ण यात्रा करण्यासाठी कैलास मानसरोवरला आवर्जून जातात कारण त्यामुळेच अष्टपदाचे दर्शन होते. महेंद्रशेठ घरत यांनीही हे दर्शन घेतले आणि आपण कैलासी आहोत हे दाखवून दिले.  
त्यामुळेच राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रिय असलेल्यांमध्ये कैलास मानसरोवर ही महाकठीण यात्रा दुसऱ्यांदा पूर्ण करणारे महेंद्रशेठ घरत हे एकमेवाद्वितीय असल्याचे मानले जात आहे. त्यांची गणना सध्या ‘पर्यटनाचा बादशहा’ म्हणून होत आहे.

Previous Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर धडकण्याचा मनसेचा इशारा

Next Post

पनवेलचा महागणपतीचा महल यंदा वातानुकुलित

Next Post
पनवेलचा महागणपतीचा महल यंदा वातानुकुलित

पनवेलचा महागणपतीचा महल यंदा वातानुकुलित

परिवहन उपक्रमाच्या बसेसचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

कॉंग्रेस जिल्हा प्रवक्ते, कामगार नेते रवींद्र सावंत नेमका काय धमाका करणार?

इमारत पुनर्बांधणीसाठी जनजागृतीस्तव महापालिका मुख्यालय व विभाग अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करा : हाजी शाहनवाझ खान

घरगुती गौरी गणपती आरास व सजावट स्पर्धा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com