जुन्नर : मातृभूमी बेघर महिला आघाडी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विश्वनेत्या दिवंगत पहिल्या भारताच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृती जतन करणे आणि माननीय दिवंगत गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोरगरीब जनतेने त्यांचे आठवण सतत जागृक ठेवणे साठी स्मृतिदिन जयंती दिन साजरा करणे देशाच्या हिताचे आहे, असे प्रतिपादन संभाजी साळवे यांनी केले.
देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जंयतीनिमित्ताने व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त जुन्नर तालुका आरपीआयच्या वतीने सफाई कामगार महिलांचा, विधवांचा, परित्यक्त्यांचा सन्मान मेळावा व साडी-चोळी, वस्त्रदान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये साळवे बोलत होते.
साळवे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले प्राण आहेत. शाहू फुले आंबेडकर हा आपला मान आहे. तर दिवंगत महिला पंतप्रधान इंदीरा गांधी आपला स्वाभिमान आहे आणि पोलादी पुरुष दिवंगत गृहमंत्री वल्लभभाई पटेल आपला सन्मान आहे. म्हणून आपण आज महिला दिन साजरा करून विश्व नेत्या इंदिरा गांधी यांचे स्मरण जागरूक ठेवण्यासाठी साडी चोळी व वस्त्रदान कार्यक्रम करून हा दिन साजरा करत आहोत. सत्ताधारी वर्गाने त्यांचे बलिदान व्यर्थ न जाता त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा कायम जनतेमध्ये प्रज्वलित राहील, असा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
महिला सन्मान साडी चोळी वाटपाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष जुन्नर तालुका आरपीआयचे अध्यक्ष पोपट राक्षे होते. गोरगरीब स्रियांना साडी चोळी वाटप जयश्री उपशाम, प्रियांका शेळके मलिबा खरात व जितेंद्र बिडवई यांच्या हस्ते पार पडले. सदर कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे आरपीआयचे उपाध्यक्ष जयश्री उपशाम, जुन्नर बाजार समितीच्या संचालिका प्रियांका शेळके महेश शेळके, रवी सोनवणे, अजिंक्य घोलप, मारुती शेठ वायाळ, विक्रम मुंढे, मधुकरजी काजळे, वंदना वाघचौरे, दिलीप वाघमारे, पोपट सोनवणे यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन अनिल सोनावणे यांनी केले या प्रसंगी पुणे जिल्हा आरपीआय समन्वयक गौतम लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते जयेश खांडगेपाटील, सुरेश खरात, गौतम खरात, संपत गायकवाड, आशा सोनवणे, आशा उर्फ छबुताई देठे, प्रवीण लोखंडे व हजारो गोरगरीब महिला हजार होत्या. सर्वांचे आभार जुन्नर शहर आरपीआयचे अध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी मांडले.



