माथाडी नेते पांडुरंग आमले यांचे महापालिका आयुक्तांना साकडे
नवी मुंबई : सानपाडा नोड (कॉलनी), सानपाडा गाव, सानपाडा पामबीच वसाहत सानपाडा नोडची दूषित पाण्याच्या विळख्यातून मुक्तता करण्याची मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सानपाडा नोड (कॉलनी), सानपाडा गाव, सानपाडा पामबीच वसाहत येथील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पिवळसर रंगाच्या दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी उकळून व गाळून घेतले तरी पाण्याचा पिवळसरपणा जात नाही. या दूषित पाण्यामुळे परिसरातील अनेकजण आजारी पडले आहेत. या दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण न झाल्यास अनेकांच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळा आता काही दिवसांवर आलेला आहे. पावसाळ्यात सुरुवातीच्या दिवसात गढूळ पाणी येते. त्यामुळे तातडीने दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण करुन सानपाडा नोड (कॉलनी), सानपाडा गाव, सानपाडा पामबीच वसाहतमधील जनतेला दिलासा देण्याची मागणी माथाडी नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

