अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : दहावी व बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नेरूळ सेक्टर 16 व 16 ए परिसरात भाजपच्या वतीने घरोघरी जावून सत्कार करण्यात आला.
भाजपच्या प्रभाग 23 (ब) मधील स्थानिक नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत व भाजपचे नवी मुंबई जिल्हा माजी चिटणिस गणेशदादा भगत यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 2010 पासून या उपक्रमाचे आयोजन नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत व गणेशदादा भगत यांच्याकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा घरोघरी जावून सत्कार करताना पालकांचेही अभिनंदन करण्यात येत आहे. नेरूळ सेक्टर 18 मधील पुणे विद्याभवन, सेक्टर 10 मधील तेरणा विद्यालय, सेक्टर 8 मधील एमजीएम विद्यालय, कुकशेत गावातील महापालिका शाळा, नेरुळ गावातील मोतीलाल नेहरु विद्यालय, दिल्ली पब्लिक स्कूल या शाळेमध्ये दहावीच्या परिक्षेत प्रथम तीन क्रमाकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही घरी जावून सत्कार करण्यात आला.
याशिवाय दहावी-बारावी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विभागातील विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्यासाठी बॅग बक्षिस म्हणून देण्यात आली तर दहावी-बारावीला विभागामध्ये प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना बॅग, डिजीटल वॉच सन्मानचिन्ह देण्यात आले. विशेष म्हणजे या सन्मानचिन्हावर विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचे छायाचित्र आहे. सन्मानचिन्ह पाहताना आपल्या यशासाठी पालकांनी केलेल्या परिश्रमाची विद्यार्थ्यांना जाणिव व्हावी हा त्यामागील हेतू असल्याची माहिती नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी दिली.
घरोघरी जावून गुणवंतांचा सत्कार करताना नगरसेविका भगत यांच्यासमवेत विमल गांडाळ, प्राजक्ता प्रभू, उषा सावंत, अस्मिता म्हात्रे, दिलीप राऊत, अशोक गांडाळ, सागर मोहिते, शुभम मोरे, अरुण यादव, सुभाष यादव, आदी उपस्थित होते.
