तुर्भे डम्पिंग ग्राउंडची 34 एकर जागा होणार महानगरपालिकेच्या मालकीची
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना अखेर यश नवी मुंबई :- गेली अनेक वर्षापासून रेंगाळत असलेला तुर्भे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न व...
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना अखेर यश नवी मुंबई :- गेली अनेक वर्षापासून रेंगाळत असलेला तुर्भे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न व...
मुंबई : 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संविधान बचाओ रॅली काढणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष...
पनवेल: पनवेल शहरासह महापालिका परिक्षेत्रातील इतर शहरे आणि काही अंशी ग्रामीण भागातील अवैध गुटखा विक्रीला बऱ्याच प्रमाणात आळा बसला आहे. मात्र,...
दिपक देशमुख नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून कुकशेत येथील महापालिका शाळेत महिलांकरिता आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. हिवताप,...
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ नवी मुंबई :- ऐरोली मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा आमदार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा या...
मुंबई : मुंबईच्या सुरक्षिततेसाठी कठोर भूमिका घेतल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे पत्र लिहून भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे. २६/११/२००८ रोजी मुंबईत...
पालिका प्रभाग समितीच्या बैठकीत जाब विचारणार असल्याचा मनोज मेहेरचा इशारा दिपक देशमुख नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयात...
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ नवी मुंबई : नवी मुंबई शहर हे समुद्रसपाटीपासून ३ मीटर खोलवर आहे. परंतु नवी मुंबई शहराचा...
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ मुंबई : मुंबईत नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमिन देणार नाही. त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जावे, त्यांचे मुंबईत...
ठाणे- ठाण्यातील मिसळ शौकीनांना पुढील आठवड्याच्या अखेरीस विविध चवींच्या आणि विविध ठिकाणांच्या प्रसिद्ध अशा चटकदार मिसळी चाखण्याची संधीलाभणार आहे. सलग तीन वर्षे पुण्यातील खाद्यप्रेमी आणि खवय्यांच्या पसंतीस उतरल्यानंतर ‘बिईंग वुमन’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारलेल्यामिसळ महोत्सवाचे आयोजन आता ठाण्यात करण्यात येत आहे. ठाण्यातील स्थानिक नगरसेवक सामंत सरांच्या प्रयत्नाने ठाण्यातील घंटाळी देवीमंदीराजवळील घंटाळी मैदानात येत्या १९, २० आणि २१ जानेवारी रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून तीनही दिवस सकाळी आठ ते रात्रौदहा वाजेपर्यंत हा महोत्सव खुला राहणार आहे. नाशिक, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, नारायणगाव, डोंबिवली, ठाणे या खास मिसळींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरातील सुप्रसिद्ध मिसळबनवणारे उद्योजक आपल्या चटकदार आणि झणझणीत मिसळींसह या महोत्सवाला हजेरी लावणार असून तब्बल ७० पेक्षा अधिक चवींच्या विविधमिसळ या महोत्सवात खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. याशिवाय दही, ताक, चहा, कॉफी,ज्यूस, आईसक्रीम, डेझर्टस, मोदक, खरवस, पुरणपोळी,कुल्फी, फालूदा अशा इतर पदार्थांचेही स्टॉल्स या महोत्सवात खवैय्यांची रसना तृप्त करण्यास सज्ज असणार आहेत. विशेष म्हणजे मिसळीचे छायाचित्रअसलेला भला मोठ्ठा बॅकड्रॉप असलेला सेल्फी पॉईंट या महोत्सवाचे आकर्षण असणार आहे. त्यामुळे तरूणाईची पावलेही या महोत्सवाकडे वळणार यातशंका नाही. बिईंग वुमन आयोजित पुण्यातील तीनही मिसळ महोत्सवांना तीस हजारांपेक्षा अधिक खवय्यांनी हजेरी लावली होती. पुण्याप्रमाणेचठाण्यातही खवय्यांची संख्या मोठी असल्याने ठाण्यातही या महोत्सवाला तुफान प्रतिसाद मिळेल, असा आयोजकांना विश्वास आहे. तीन दिवसांतसाधारण पंधरा हजार लोक या महोत्सवाला भेट देतील असा, आयोजकांचा अंदाज आहे.
"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com
"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com