लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री
देशातील प्रत्येक प्रश्नाच्या निराकरणासाठी भारतीय लोकशाही व्यवस्था सक्षम नागपूर : आपल्या लोकशाहीची रचना अत्यंत आदर्शवत असून देशातील प्रत्येक प्रश्नाचे निराकरण करण्याची क्षमता संविधानाने दिलेल्या या लोकशाही व्यवस्थेत आहे. आजच्या तरुणांनी ही लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने विधानमंडळातील विधानपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या संसदीय अभ्यासवर्गाच्या उद्घाटन समारंभात ते बोलतहोते. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, शिक्षण आणिसंसदीय कार्य मंत्री विनोद तावडे, आमदार ॲड. आशिष शेलार, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आदी मान्यवर उपस्थित होते. या अभ्यासवर्गात राज्यातील 11विद्यापीठांतील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, न्यायमंडळ, विधानमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे आपल्या लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत. सरकार म्हणून ओळखले जाणारे कार्यकारी मंडळ हे राज्यातील प्रत्येक प्रश्नासाठी विधानमंडळाला उत्तरदायी असते. याशिवाय राज्यात होणाऱ्या पै-न-पै खर्चाचा आढावा शासनाला विधीमंडळास सादर करावालागतो. त्यामुळे सत्ता निरंकुश होऊ नये यासाठी त्याला विधानमंडळास उत्तरदायी ठेवण्यात आले आहे. कायदे करणे हा विधानमंडळाचा सार्वभौम अधिकार आहे. सभागृहात अनेक महत्वाच्या कायद्यांवर 2 ते 3 दिवस चर्चा होते. महत्वाच्या कायद्यांवर...






