मुंबई : विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून सर्वसाधारण परिस्थितीतून येऊनउद्योग, गृहनिर्माण क्षेत्रात सुरेश हावरे यांनी केलेले कार्य आदर्शवत असे आहे. मराठी व्यक्ती उद्योग करु शकत नाही असे नेहमी म्हटले जाते, पण सुरेश हावरे यांनी चांगल्या पद्धतीने उद्योग प्रस्थापित करुन हा गैरसमज खोडून काढला आहे. त्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. श्री. हावरे यांना नुकतीच पीएचडी पदवी प्राप्त झाली, त्यानिमित्त ताज हॉटेल येथे आज मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शाल, श्रीफळ आणि विद्यापीठाचेगौरवपत्र देऊन श्री. हावरे यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले की, परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात उद्योजक सुरेश हावरे यांनी केलेले संशोधन निश्चितचउपयुक्त असे आहे. अणुविज्ञान, गिर्यारोहण, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रात श्री. हावरे यांनी योगदान दिले असूनत्यांच्यावर देण्यात आलेली शिर्डी संस्थानाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही ते चांगली पार पाडून या क्षेत्रातहीउल्लेखनीय योगदान देतील. देशातील प्रत्येक नागरिकाला घर उपलब्ध करुन देण्याचे प्रधानमंत्र्यांचे स्वप्न आहे.त्यानुसार अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला २०१९ पर्यंत घर देण्याचेध्येय असून अडीच लाख घरांची निर्मिती सुरु झाली आहे, असे ते म्हणाले. यावेळी श्री. हावरे यांच्या ‘उद्योग करावा ऐसा’, ‘डुइंग बिझनेस विदाऊट युअर मनी’ या पुस्तकांसह ‘सुरेशहावरे बिझनेस शो’च्या डीव्हीडीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच दूरचित्रवाणी वाहिन्यांवरलवकरच सुरू होणाऱ्या ‘दि सुरेश हावरे स्टार्टअप शो’चा शुभारंभ करण्यात आला.
Read moreसुजित शिंदे : 9619197444 मुंबई, दि. ५ : राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या ऐतिहासिक योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून 2009...
Read moreसुजित शिंदे : 9619197444 नवी मुंबई : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येणाऱ्या पदयात्री साई पालख्यांच्या प्रतिनिधींच्या...
Read moreमुंबई दि 30 - पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विचारवंत प्रा डॉ गंगाधर यांचे मराठी साहित्यात अपूर्व योगदान दिले असून त्या...
Read moreगणेश इंगवले / नवी मुंबई चार-पाच दिवसापासून सुरु झालेल्या पाऊसाने मुंबईकर भिजून निघाले आहेत. पाऊसामुळे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण, आंदोलन...
Read moreगणेश इंगवले नवी मुंबई : राज्यातील बळीराजा १ जुनपासून संपावर गेल्याचा फायदा उचलत परराज्यातील शेतकर्यांनी आपल्या भाज्या मुंबईतील मार्केटमध्ये पाठविण्यास सुरूवात केली...
Read moreअनंतकुमार गवई मुंबई : मे महिना हा प्रशासन दरबारी विशेषत: मंत्रालयात बदल्यांचा सिझन म्हणून ओळखला जातो. आता जून एक आठवडा...
Read moreसुजित शिंदे मुंबई : कृषी मालाच्या विक्रीरूपातील अर्थकारणातील व्यापार्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारने शेतकर्यांना थेट कृषी माल विक्री...
Read moreआगार अभियंत्यालादेखील कारणे दाखवा नोटीस पुणे : महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी स्वारगेट आगाराच्या कामकाजात त्रुटी आढळल्याने आगार...
Read moreउत्साही कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची कोंडी झाली. पुणे : नोटाबंदीला ५० दिवस झाल्यानंतरही परिस्थितीत बदल न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आज...
Read more"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com
"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com